स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य चळवळीचा काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ या काळाच्या तीन टप्प्यांवर सत्तांतर घडत असताना निर्माण झालेल्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षांचा आविष्कार प्रत्यक्ष जीवनात झाला का? मानवी मूल्यांची जी पहाट आपण अपेक्षिली होती ती प्रत्यक्षात उजाडली का? आपला प्रवास त्या बिंदूपासून पुढे सुरू झाला की परत मागच्या दिशेने? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत सद्य:काळाविषयी आपल्याला विचारप्रवृत्त करणारी महत्त्वाची कलाकृती.